कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित असलेले 67.70 टीएमसी पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी आणि औद्योगिकरणासाठी वापरावे अशी मागणी…

महाराष्ट्रातील काही जिल्हे सोडले तर बाकी सर्व जिल्ह्यात पावसाने दिलेल्या उघडीपिने शेतकरी अडचणीत आलेले आहेत. आत्तापर्यंत इतके दिवस पोसलेली व हातातोंडाशी आलेली पिके जगविणे अशक्य झालेले आहे. अशा अवस्थेत आपल्या कोयनेसह सर्व धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणी साठा आहे.
कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित असलेले 67.70 टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी न वापरता, ते नागरिकांना पिण्यासाठी, शेतीसाठी आणि औद्योगिकरणासाठी वापरावे व भविष्यातील पाऊसमानावर वीज निर्मितीकडे ते वळवावे अशी मागणी मा. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे करत त्याबद्दल महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची सत्वर बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

Loading

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top